इंसाफ की कायदा व न्यायदेवता यांची कुचेष्टा?
आदरणीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन.डी. टीवी व "राखी का इंसाफ" मालिकेचे सर्व लोक. सर्वप्रथम मला एका प्रश्नाचं उत्तर द्या - "राखी का इंसाफ" ही मालिका आपल्या घरी - कुटुंबासह - पाहता का?
परवा टी.व्ही. वर कार्यक्रम चाळताना ही मालिका पाहण्याचे अहोभाग्य लाभले. काय ती बया... काय तिचे कपडे...काय ती भाषा अन् काय ती मालिका! एन्.डी.टी.व्ही. सारख्या चांगल्या चॅनलने स्वत:च्या व लोकांच्या आब्रुची अशी लख्तरं काढावीत - खरं नाही वाटलं! मला हेच कळत नाही - नवरा - बायको, प्रेमी-प्रेमिका यांसारखी नाती काय अशी चव्हाट्यावर डिस्कस करावीत ? हां, आता बर्यापैकी हा भाग एक पब्लिसिटी स्टंट असु शकेल, टी.आर.पी. वाढवण्याचे प्रयोगही असतील - नाही असं नाही. मात्र त्या भागातल्या एकांनं आत्महत्या करावी इतपत हे प्रकरण जावं ? तो भाग पाहताना त्यातील एकालाही अक्कल नावाचा प्रकार असल्याचे जाणवले नाही. म्हणे एका बाईने "मामा" विरुध्द बळजबरीची केस केलेली - त्यात तिचा नवरा साथ न देता म्हणे त्रास देत होता. त्यावर बाईसाहेबांची कमेंट - नामर्द - नपुंसक अशी होती. बिचारा - समाजात - पै-पाव्हण्यांत लाजं-काजं नाही जगु शकला - गेला!
ही लोकं - टी.व्ही. वर दिसणार या विचारांनच एवढी हुरळुन जातात की आपणच आपल्या आब्रुची लख्तरं काढतोय याचं जराही भान त्यांना नसतं. भांडणं आहे - अडचणी आहे तर पोलिसांत जा - न्यायालयात दाद मागा - असल्या भिकारड्या कार्यक्रमात कसं काय जाऊ शकता? एकमेकांना शिव्या देत - कुठला इंसाफ वाटला जातो तेच नाही कळत.
न्यायमुर्ती म्हणुन किमान तुम्ही पुर्ण पोषाखात तरी असावं.. भाषा स्वच्छ असावी. टीचभर कापडात आणि अकलेला पत्ताही नसलेल्या व्यक्तिकडुन स्वत:ची अक्कल गहान ठेवुन कसला इंसाफ मागताहात! स्वत:च्या लग्नाचा व लफड्यांचा मोजमाप नसणार्याने - प्रेम - संबंध - लग्न संस्था यांसारख्या विषयांवर काहीही बरळावं? वा रे वा!
वकिलांनी ही मालिका बंद करण्याची याचिका दिली तर बाईसाहेब म्हणतात - कदाचित मी त्यांच्या प्रोफेशन मध्ये आले तर म्हणुन वकिलांना असुरक्षितता वाटायला लागलीय!!
अरे वा! असा कुणीही उठ-सुठ वकिल अन् न्यायाधिश होतो काय? काय मस्त जोक मारतात ना, बाईसाहेब?
असो - आपण तर एन.डी.टी.व्ही. ब्लॉक केलाय. गटारीत पडण्यापेक्षा गटार बंद केलेली कधीही चांगली! तुमचं तुम्ही बगा!
परवा टी.व्ही. वर कार्यक्रम चाळताना ही मालिका पाहण्याचे अहोभाग्य लाभले. काय ती बया... काय तिचे कपडे...काय ती भाषा अन् काय ती मालिका! एन्.डी.टी.व्ही. सारख्या चांगल्या चॅनलने स्वत:च्या व लोकांच्या आब्रुची अशी लख्तरं काढावीत - खरं नाही वाटलं! मला हेच कळत नाही - नवरा - बायको, प्रेमी-प्रेमिका यांसारखी नाती काय अशी चव्हाट्यावर डिस्कस करावीत ? हां, आता बर्यापैकी हा भाग एक पब्लिसिटी स्टंट असु शकेल, टी.आर.पी. वाढवण्याचे प्रयोगही असतील - नाही असं नाही. मात्र त्या भागातल्या एकांनं आत्महत्या करावी इतपत हे प्रकरण जावं ? तो भाग पाहताना त्यातील एकालाही अक्कल नावाचा प्रकार असल्याचे जाणवले नाही. म्हणे एका बाईने "मामा" विरुध्द बळजबरीची केस केलेली - त्यात तिचा नवरा साथ न देता म्हणे त्रास देत होता. त्यावर बाईसाहेबांची कमेंट - नामर्द - नपुंसक अशी होती. बिचारा - समाजात - पै-पाव्हण्यांत लाजं-काजं नाही जगु शकला - गेला!
ही लोकं - टी.व्ही. वर दिसणार या विचारांनच एवढी हुरळुन जातात की आपणच आपल्या आब्रुची लख्तरं काढतोय याचं जराही भान त्यांना नसतं. भांडणं आहे - अडचणी आहे तर पोलिसांत जा - न्यायालयात दाद मागा - असल्या भिकारड्या कार्यक्रमात कसं काय जाऊ शकता? एकमेकांना शिव्या देत - कुठला इंसाफ वाटला जातो तेच नाही कळत.
न्यायमुर्ती म्हणुन किमान तुम्ही पुर्ण पोषाखात तरी असावं.. भाषा स्वच्छ असावी. टीचभर कापडात आणि अकलेला पत्ताही नसलेल्या व्यक्तिकडुन स्वत:ची अक्कल गहान ठेवुन कसला इंसाफ मागताहात! स्वत:च्या लग्नाचा व लफड्यांचा मोजमाप नसणार्याने - प्रेम - संबंध - लग्न संस्था यांसारख्या विषयांवर काहीही बरळावं? वा रे वा!
आपापसांतील मत-भेद - भांडणावर आधारीत "आपकी कचेरी" नावाचा किरण बेदींचा कार्यक्रम यायचा/ येत असेल. बर्याचदा पाहिलाय. शांतपणे दोन्ही बाजुंची मतं ऐकुन विचारपुर्वक निकाल देणार्या बेदींबद्दल कमालीचा आदरही वाटायचा/ वाटतो.
वकिलांनी ही मालिका बंद करण्याची याचिका दिली तर बाईसाहेब म्हणतात - कदाचित मी त्यांच्या प्रोफेशन मध्ये आले तर म्हणुन वकिलांना असुरक्षितता वाटायला लागलीय!!
अरे वा! असा कुणीही उठ-सुठ वकिल अन् न्यायाधिश होतो काय? काय मस्त जोक मारतात ना, बाईसाहेब?
असो - आपण तर एन.डी.टी.व्ही. ब्लॉक केलाय. गटारीत पडण्यापेक्षा गटार बंद केलेली कधीही चांगली! तुमचं तुम्ही बगा!
७ टिप्पण्या
बाईसाहेबांबद्दल न बोललेलंच चांगलं! :)
बाईसाहेबांन बद्दल न बोललेच बर.
अकलेचा पत्ता नसणारे आपली गार्हाणी एका निर्लज्ज आणि माथेफिरू बाईसमोर मांडतात हे पाहून हसु आवरत नव्हतं...
एका मुलाखतीत बाई (?) म्हणतात, मै दो दिलॊंकॊ जोडुंगी.. ईथे सगळे मारामरी करत एकमेकांच्या उरावर बसतात आणि तिचं वाक्य सत्य ठरतं.. ;-)
Rajanna pan vatat asel kai hey...bare aahe mi gelo lavkar..nahi tar kai kai baghave lagle aste re.... jagdamb..jagdamb..jagdamb