आनंद मेळावा: १०० वर्षांपुर्वीचे महाराष्ट्र दर्शन

भारत देश व महाराष्ट्र २२व्या शतकाकडे प्रगतीची वाटचाल करीत आहे. धकाधकीच्या जीवनात नागरीक व अभ्यासाच्या ओझ्याखाली विद्यार्थी दबून गेला आहे. अशा वेळी १०० वर्षांपुर्वीचे ग्रामीण जीवन कसे होते? हे आजच्या तरुण पिढीला माहित नाही. मामाच्या चिरेबंदी वाडा फक्त बालगीतांमधुनच मुलांना ऐकायला मिळतो. वासुदेव, वाघ्या-मुरळी, पिंगळा इ. सांस्कृतिक ठेवा लोप पावत चाललेला आहे.


आनंद मेळावा: ५५० कलाकारांनी साकारलेली १०० वर्षांपुर्वीची महाराष्ट्रातील ग्रामीण लोककला, संस्कृती व गाव यांचे सजीव दर्शन.

१०० वर्षांपुर्वी प्रत्येक खेडे स्वयंपुर्ण होते. गावाची गरच गावातच भागवली जात होती. रामप्रहरी वासुदेव गाणे गात सर्व गावाला जाहे करीत होता. भल्यापहाटे शेतकरी मोटेवर गाणी गात शेताला पाणी पाजत होता. तेल तेल्याच्या घाण्यावर, सनगर व कोष्टी यांच्या हातमागावर घोंगडी, लुगडी विणली जात होती. पखालीतुन कोळी सर्व गावाला पाणी पुरवत होता. हे सर्व गावचे असणारे गतवैभव लुप्त झाले आहे.

आनंद मेळावा २०११
ठिकाणः गो-हे बुद्रुक - डोणजे - सिंहगड - पुणे
दि. २२ एप्रिल ते ८ मे २०११
वेळ: दुपारी ३ ते रात्री ८

छायाचित्र - पिकासा आल्बम वरुन - साभारः समीर
आपल्या माहितीसाठी सयाजीराजेपर्क.कॉम वरुन! पी.डी.एफ. = सयाजीराजेपर्क.कॉम