वांद्रे-वरळी सी लिंक आणि राजकारण!

...राजकारण गेलं चुलीत म्हणतात ते काही खोटं नाही.. एवढा चांगला लिंकरोड झाला... लोकांची सोय झाली.. आणि राजकारण्यांना चेव चढलाय - नामांतराचा!



मला मात्र एक गोष्ट समजत नाही... नामांतरावरुन एवढा गोंधळ का? कशासाठी... ? राजीव गांधी किंवा सावरकरजी - दोघांच्याही नावाचे राजकारण करण्याची गरज नाही. सत्तारुढ पक्षाने "राजीव गांधी" असे नामकरण केले तर विरोधी पक्षाचे आक्षेप.... मात्र हाच पक्ष सत्तारुढ असता आणि सत्तारुढ विरोधी पक्ष असतात तर ही हे प्रकरण असेच रंगले असते.. तेंव्हा हा पक्ष योग्य आणि तो अयोग्य असे होत नाही ना? एखाध्याने चांगलं काम केलं तर त्यात पाय आडवा आणायलाच पाहिजे का? नामकरण ज्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले नाही तर असे लोक या रोडचा वापर करण्याचे सोडतील का? किंवा, सावरकरांचे नाव दिले तर सत्तारुढ पक्षाचे नेते या रोडवरुन येणे-जाणे वर्ज करतील.... दोन्हीही प्रश्न्नाचे उत्तर नाही, असेच आहे! मग वाद कशाला?
.... स्वदेस, सिनेमातला तो "मेलाराम" आणि त्याची मोहनला [शाहरुख खान] दिलेली पार्टनरशीपची औफर आठवतीय का.. त्यात तोही "मेलाराम का मोहन ढाबा" किंवा "मोहन का मेलाराम ढाबा" असे सुचवितो! मात्र शेवटी तोच हा विषय सोडुन देतोच ना!

असो... वादावादी कीतीही चालो... आपण मात्र मुंबईला गेलो कि या रोडवरुन एक चक्कर जरुर मारणार! आतापर्यत परदेशात आणि सिनेमातच पाहिलेलं असे रोड आता आमच्या भारतात - मुंबईत ही आहे, असं अभिमानाने सांगण्यासाठी आणि तो अनुभव घेण्यासाठी!