गुरुवार 15 मार्च 2012

आळीमिळी -गुपचिळी...

... शिवरायांच स्मारक जमीनीवर उभारण्यास जागा नाही म्हणुन समुद्रात उभाराचे वादे.. १९९५ सालापासुन जनतेला अक्षरशः चुना लावत चाललेलं हे स्मारकाचं राजकारण... हजारो एकरचे ग्रहप्रकल्प करण्यासाठी यांच्याकडे जमीन आहे... नसेल तर बळकवायचीही तयारी... पर्यावरणाच्या गोष्टी फक्त स्मारकासाठीच लागु का?... त्या ग्रह प्रकल्पांसाठी पर्यावरण खात्याची परवानगी मिळवण्यासाठी राजकारण्यांची कामगिरी वाखानण्याजोगी.. मग स्मारकासाठीच का आळीमिळी? आयुष्यभर राजांच्या नावाचं राजकारण करणारे नेमके याच बाबतीत गप्प का?



शिवरायांचे स्मारक, स्मृती आमच्या हृदयात आहे... उगाच राजकारण करु नका... राजकारणी म्हणुन आपण लायक नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे.. त्याची प्रचितीही आलीच आहे.. मग आता काय 'सर्टीफाय' होण्याची वाट पाहताहात का?


सचिन व त्याच्या कामगिरीची बाराखडीही माहिती नसलेले, उगाचच त्याच्या 'त्या' शतकाची कुचेष्टा करताहेत.. सोशल नेटवर्किंगवरुन आपल्या अकलेचे दिवे पाजळताहेत... का.. कशासाठी..? आपल्या आयुष्यात आपण असे किती दिवे लावलेत ज्यासाठी आपण सचिनच्या रेकॉर्डची वाट पहात आहात...?

शनिवार 8 ऑक्टोबर 2011

मराठीब्लॉगर्स डॉट नेट: मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची संग्रहीका

मराठी ब्लॉगर - लेखक आणि वाचक यांच्या माहितीसाठी:
मराठीब्लॉगर्स डॉट नेट हे मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची एकत्र संग्रहीका [Marathi Blogs and Marathi Website Syndication Directory of Marathi Bloggers] आहे. मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे. अनेक उत्तम आणि वाचनिय लेख कधी-कधी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग माहित नसल्याने वाचायचे राहुन जातात. तेंव्हा अधिकाधिक ब्लॉगर्सचे ब्लॉग येथे जोडुन त्यांना आणि त्यांच्या लेखनाला अधिकाधिक वाचकवर्ग मिळवुन देण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय.

चला तर मग, वाचुयात मराठी लेख, कविता, कथा आणि इतर मराठी साहित्य – अर्थात महाजालावरील आवडीचे मराठी ब्लॉग – मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर!

सोमवार 18 एप्रिल 2011

आनंद मेळावा: १०० वर्षांपुर्वीचे महाराष्ट्र दर्शन

भारत देश व महाराष्ट्र २२व्या शतकाकडे प्रगतीची वाटचाल करीत आहे. धकाधकीच्या जीवनात नागरीक व अभ्यासाच्या ओझ्याखाली विद्यार्थी दबून गेला आहे. अशा वेळी १०० वर्षांपुर्वीचे ग्रामीण जीवन कसे होते? हे आजच्या तरुण पिढीला माहित नाही. मामाच्या चिरेबंदी वाडा फक्त बालगीतांमधुनच मुलांना ऐकायला मिळतो. वासुदेव, वाघ्या-मुरळी, पिंगळा इ. सांस्कृतिक ठेवा लोप पावत चाललेला आहे.


आनंद मेळावा: ५५० कलाकारांनी साकारलेली १०० वर्षांपुर्वीची महाराष्ट्रातील ग्रामीण लोककला, संस्कृती व गाव यांचे सजीव दर्शन.

१०० वर्षांपुर्वी प्रत्येक खेडे स्वयंपुर्ण होते. गावाची गरच गावातच भागवली जात होती. रामप्रहरी वासुदेव गाणे गात सर्व गावाला जाहे करीत होता. भल्यापहाटे शेतकरी मोटेवर गाणी गात शेताला पाणी पाजत होता. तेल तेल्याच्या घाण्यावर, सनगर व कोष्टी यांच्या हातमागावर घोंगडी, लुगडी विणली जात होती. पखालीतुन कोळी सर्व गावाला पाणी पुरवत होता. हे सर्व गावचे असणारे गतवैभव लुप्त झाले आहे.

आनंद मेळावा २०११
ठिकाणः गो-हे बुद्रुक - डोणजे - सिंहगड - पुणे
दि. २२ एप्रिल ते ८ मे २०११
वेळ: दुपारी ३ ते रात्री ८

छायाचित्र - पिकासा आल्बम वरुन - साभारः समीर
आपल्या माहितीसाठी सयाजीराजेपर्क.कॉम वरुन! पी.डी.एफ. = सयाजीराजेपर्क.कॉम